देश\विदेशराजकारण
Trending

पाकिस्तान सुध्दा सांगेल खरी शिवसेना कोणाची, पण निवडणुक आयोगाला मोतीबिंदू झालाय: उद्धव ठाकरे

पाचोरा, जळगाव दि. २३ – सगळा जल्लोष बघितल्यावर शिवसेना कुणाची?  हे दिसतयं!  पाकिस्तान सुध्दा सांगेल खरी शिवसेना कोणाची, पण निवडणुक आयोगाला मोतीबिंदू झालाय तो त्यांचा प्रश्न. हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र, महाराष्ट्र बघतोय. काही जणांना वाटले तेच शिवसेना पण अश्या अनेक घुशी आम्ही बघितल्या आणि निवडणुकीत आपटल्या, असा हल्लाबोल शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील विराट सभेत केला. भाजपा, शिंदे गटावर ठाकरेंची तोफ धडाडली. ठाकरेंचे भाषण त्यांच्याच शब्दात….

जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो,

आज खरच तात्यांची उणीव भासते, ४० गद्दार गेले तरी फरक पडत नाही पण एक निष्ठावंत गेले की उणीव जाणवते. तात्यांच्या पुतळ्याचे अनावरण करावे लागेल असे वाटले नाही. वैशाली ताईंसोबत भेटीची आठवण. वैशाली ताईंचा अभिमान. शेतकऱ्यांच्या साठी झटणारे हे घराणे.

मेहनत तुम्ही करता आणि टिकोजीराव वर बसतात आता पुन्हा त्यांना खाली खेचण्याची वेळ आली आहे. निवडून आलेले गद्दार झालेत पण निवडून देणारे आजही माझ्या सोबतच आहेत. अंबादास यांनी व्यथा मांडल्या शेतकऱ्यांच्या. आपले सरकार होत तेव्हा कोरोनाचे जागतिक संकट होते. नैसर्गिक संकटात आपण सरकार असतांना मदत केली. आता सरकारच अवकाळी, यांनी एकाही संकटात मदत केली नाही मग हे बोलावेच लागणार.

जळगावातील कवी शेतकऱ्याची भेट झाल्याचा उल्लेख.  पोलीसांना आवाहन करतो शेतकऱ्यांना त्रास देऊ नका. (कवितेच्या ओळी. बहिणाबाई जर आज असत्या तर त्यांना पण या सरकारने तुरूंगात टाकले असते. बहिणाबाईंच्या कवितेच्या ओव्या.) आईच्या कुशीवर वार करणारी गद्दारांची अवलाद आपली नाही. काही लोक बाप बदलतात आणि बाप चोरतात. तुमच्या मेहनतीचे रक्त पिणारे हे गद्दार आहेत त्यांना मारायला तोफ नको. आज माझ्याकडे काही नाही पण तुम्ही आशीर्वाद देणारे हात माझ्या सोबत त्यांनी येऊन दाखवावे.

भाजप हे आव्हान नाही, पण ते सत्तेवर आहेत त्या दरम्यान जे नुकसान होईल ते दूर कसे करायचे ते आव्हान आहे. (दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्येची बातमी.) २६ वर्षाचा मुलगा आत्महत्या. लोकसंख्येचे देशात अमाप पीक पण तरुण मुले आत्महत्या करताहेत. राजा निवडायचा हक्क तुमचा. पण तुमच्या डोळ्यात धूळफेक. लोकसभेच्या निवडणुकीत मोदी महागाई वर बोलायचे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झालय असेल तर हात वर करुन सांगा. निवडणुक आली की अबकी बार आता यांना आपटा.

सत्यपाल मलिक यांनी पुलवामाचे सत्य सांगितले. काश्मीर बद्दल बोलले आता त्यांच्या मागे सीबीआय लावली. पुन्हा काश्मीरात जवान मारले गेले पण अमित शहा निवडणुक प्रचारात कर्नाटकात. मलिक यांना काही बोलू नका म्हणून सांगितले. काही लोक लाचारी म्हणून तुमच्याकडे येतात. मग तुम्ही काय त्यांच्यावर गोमूत्र शिंपडता. यांना भारत मातेचे कुठलेही पक्ष नको फक्त भाजप ठेवायची आहे.

२०१४ युती तुटल्याची आठवण. तेव्हा खडसेंच्या गळ्यात युती तोडल्याचॆ खापर टाकले. आज नाव चिन्ह नाही पण जनसागर उसळतोय, शिवसेनाप्रमुखांचे आशीर्वाद. आपल्या लोकांना बाहेर कसे जातील हे भाजप प्रयत्न आणि इतर पक्षातील भ्रष्ट पक्षात घेतात. संजय राऊतांचे कौतुक. नितिन देशमुखांची परत येण्याची आठवण. राजन साळवींना त्रास देणे सुरु आहे, वैभव नाईक जे माझ्या सोबत त्यांची छळवणूक ईडी सीबीआय. या एकदाचे जेल भरोच करु. आव्हाने कसले देता नामर्दपणा करतायत. राहुल गांधींबाबत पण तेच त्रास देणे सुरु आहे.

मिंधे सरकारने काय दिलय? मी घरी बसून जे सरकार चालवल ते तुम्ही वणवण फिरुन पण तुम्ही करु शकत नाही. घराणेशाहीत पण एक परंपरा असते. तुम्ही म्हणता फकीर पण तुम्ही निघून जाल पण जनतेचे काय? वैशालीताई लढण्यासाठी माझ्याकडे. वैशालीताईंच्या पाठीशी तुम्हाला राहावे लागेल. न्याय मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. मी तीन वर्षात एकतरी प्रसंग मला सांगा की मी हिंदुत्व सोडले. मुख्यमंत्री म्हणून मी घटनेची शपथ घेतली. सर्व धर्मीयांना समान वागणूक दिली. मी हिंदुत्व सोडले नाही सोडणार नाही पण आपले हिंदुत्व शेंडी जानव्याचे नाही तर राष्ट्रीयत्व आहे. भाजपचे हिंदुत्व काय समजतच नाही. एका राज्यात गोहत्याबंदी एका राज्यात नाही. उलट लोकांना चिरडतायत हे आमचे हिंदुत्व नाही. (ठाण्याचा रोशनी शिंदे हल्ला प्रकरणाचा संदर्भ.) हे असले यांचे हिंदुत्व हे आमचे हिंदुत्व नाही. रोशनी शिंदेवरच गुन्हे दाखल केले त्यांची तक्रार घेतली नाही.

भारतमातेच्या सुपुत्र हे भाजपसाठी नाहीत. वाजपेयींची आठवण. पाचोरा जिवंत आहे. भगव्यावर गद्दारांचा नाही. ज्याचे स्वतःचे काही नाही तेच चोरी करताहेत. खारघरच्या दुर्दैवी घटनेची आठवण. सोहळ्याचा हेतूच वाईट. भाजपला आव्हान त्यांनी जाहीर करावे ते मिंधेच्या नेतृत्वात लढणार आहेत का? तुम्ही मोदी आणि चोरलेले धनुष्यबाण घेऊन या मी माझ्या नावावर येतो आग दिसतेय म्हणून निवडणुका घेण्याची हिंमत होत नाही. आता निवडणुका लावा मी तयार आहे. मशालाची धग अशी लावू की तुमचे सिंहासन हलेल.

महाराष्ट्र गद्दारांचा नाही वीरांचा आहे. दोन्ही हात वर करून वज्रमूठ दाखवा. वाट बघत होतो घुसणारे कधी घुसतायत. मी राज्यभर येणार आहे. तुमच्यावर पुढील निवडणुकीची जबाबदारी. महाराष्ट्र पिंजून काढणार गद्दारांची विल्हेवाट. दिवसा सूर्य आग ओकत असतो पण तुमची जी डोकी आहे ती तापली पाहिजेत. (शिवसेनाप्रमुखांच्या विधानाची आठवण.)

जय हिंद जय महाराष्ट्र

Back to top button
error: Content is protected !!