छत्रपती संभाजीनगर
Trending

विद्यापीठाच्या परीक्षेवर बहिष्कार, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अटळ ! शिंदे-फडणवीस सरकारने कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली !!

संपाची तीव्रता आणखी वाढविणार : डॉ.कैलास पाथ्रीकर

Story Highlights
  • महाराष्ट्र शासनाने राज्यातील ४० हून अधिक विभागातील कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू केला. मात्र १३ विद्यापीठ व अनुदानित महाविद्यालयांना सापत्न वागूणक दिली आहे.

संभाजीनगर लाईव्ह, दि.१७ : महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठ व महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या तोंडाला पाने पुसल्याचे काम राज्य सरकारने केले आहे. त्यामुळे २० फेब्रुवारी पासून अधिक तिव्रतेने बेमुदत संप करण्याचा निर्धार कर्मचारी महासंघाने घेतला आहे, अशी माहिती राज्य उपाध्यक्ष डॉ.कैलास पाथ्रीकर यांनी दिली.

महाराष्ट्र शासनाने राज्यातील ४० हून अधिक विभागातील कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू केला. मात्र १३ विद्यापीठ व अनुदानित महाविद्यालयांना सापत्न वागूणक दिली आहे. त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी गुरुवारी (दि.१६) विविध मागण्यांसाठी लाक्षणिक संप केला. २० फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्धार करण्यात आला तर या आंदोलनात पुढील मागण्यांचा समावेश आहे.

१ .सेवांतर्गत सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा रद्द करण्यात आलेला शासन निर्णय पुनर्जीवित करून सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना पूर्वत लागू करणे .
२. सातव्या वेतन आयोगातील तरतुदीनुसार १० :२० :३० वर्षानंतरच्या लाभाची योजना विद्यापीठे व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करणे

३. सातव्या वेतन आयोगापासून वंचित असलेल्या १ हजार ४१० शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करून विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जानेवारी २०१६ प्रत्यक्ष सातवा वेतन लागू झाला त्या कालावधीतील वेतनाच्या फरकाची थकबाकी अदा करणे .
४. विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त असलेली पदे भरण्यास मान्यता देणे

५. २००५ नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे
६ .विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाची वेतनश्रेणी गृहीत धरून त्या आधारे सातवा वेतन आयोगाची वेतनश्रेणी लागू करणे. या मागण्या संदर्भात १५ फेब्रुवारी रोजी राज्य विद्यापीठी व महाविद्यालयीन सवेक संयुक्त कृती समितीची मुंबईत बैठक झाली. याचे इतिवृत्त शुक्रवारी पाठविण्यात आले. मात्र एकाही मागणीवर ठोस आश्वासन दिलेले नाही. त्यामुळे संपाचा निर्धार कायम ठेवण्यात आला आहे.

या प्रमुख मागण्यासाठी कर्मचाऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा करूनही शासनाने कोणत्याही प्रकारचा निर्णय न घेतल्यामुळे आज आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यामध्ये कर्मचाऱ्यांनी विद्यापीठाच्या परीक्षेवर बहिष्कार टाकून आजपासून परीक्षेचे काम बंद आंदोलनाची सुरुवात करून कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. २० फेब्रुवारी पासून हा संप आणखी तीव्र करण्यात येणार आहे.

Back to top button
error: Content is protected !!