राजकारण
Trending

काँग्रेसला वंचित बहुजन आघाडीचा ७ दिवसांचा अल्टिमेटम ! अन्यथा महाराष्ट्रातील सर्व ४८ जागा लढणार !!

मुंबई, दि. २५ – काँग्रेसला आघाडी करण्यात रस आहे का? VBA सोबत? काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांना पाठवलेल्या पत्राच्या उत्तराची प्रतीक्षा ॲड. प्रकाश आंबेडकर करत आहेत; आणखी 7 दिवसांचात उत्तर द्या अन्यथा सर्व 48 जागांवर निवडणूक लढवू, असा इशारा वंचित बहुजन आघाडीने कॉंग्रेसला दिला आहे.

यासंदर्भात वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रदेश प्रवक्ता सिद्धार्थ मोकळे यांनी दिलेली माहिती अशी की, १ सप्टेंबर २०२३, शुक्रवार रोजी, वंचित बहुजन आघाडीचे (VBA) प्रवक्ते ॲड. प्रियदर्शी तेलंग यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना एक ई-मेल लिहिला जेव्हा INC आणि त्यांचे सहयोगी तिसर्‍या INDIA बैठकीसाठी मुंबईत होते.

ई-मेल त्यांना दोन प्रमुख कारणांसाठी लिहिला होता. एक म्हणजे मुंबईत INDIA आघाडीच्या बैठकीसाठी VBA ला आमंत्रण पाठवले असल्याच्या त्यावेळच्या अफवा खोडून काढण्यासाठी काँग्रेसला विनंती करणे, आणि दुसरे म्हणजे VBA चे दरवाजे खुले आहेत हे सांगणे.

“आज भाजप-आरएसएस देशाला बरबाद करताहेत. जर INDIA आघाडी भाजप-आरएसएसच्या फुटीरवादी विचारसरणी आणि राजकारणाशी लढण्यास खरोखरच गंभीर असेल, तर प्रत्येक धर्मनिरपेक्ष आणि समविचारी पक्षांना सहभागी करून घेणे काँग्रेसचे कर्तव्य आहे. परत एकदा सांगतो, आमचे दरवाजे खुले आहेत”, असे तेलंग यांनी लिहिलेल्या ई-मेलच्या समारोपाच्या परिच्छेदात म्हटले आहे.

ई-मेल पाठवून आणि तेलंग यांच्या X (पूर्वीचे ट्विटर) हँडलवर सार्वजनिक करून जवळपास एक महिना झाला आहे, परंतु मल्लिकार्जुन खर्गे किंवा INC मधील त्यांच्या कोणत्याही सहकाऱ्याकडून कोणताही प्रतिसाद आलेला नाही.

VBA ला हे जाणून घ्यायचे आहे की आम्हाला कधीतरी उत्तर मिळणार आहे का. मिळणार नसेल तर काँग्रेसने महाराष्ट्रातील जनतेला समजावून सांगावे की, काँग्रेसला वंचित आणि बहुजनांना आघाडीत सहभागी का करून घ्यायचे नाही. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत आणि 2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 6.98 आणि 5.57 टक्के मते मिळविणाऱ्या पक्षाला आघाडीचे आमंत्रण का पाठवले गेले नाही किंवा सामील केले गेले नाही याचे स्पष्टीकरण त्यांनी द्यावे. 2019 पासून ज्या पक्षाची लोकप्रियता आणि मतदारांची संख्या वाढली आहे तो पक्ष युतीत का नाही याचे स्पष्टीकरण दिले पाहिजे. प्रामुख्याने, INC ने त्यांच्याकडून चालवल्या जाणार्‍या सर्व खोट्या बातम्या आणि खोट्या कथा तसेच सोशल मीडियावर नव्याने कामाला लावलेल्या ट्रोल्सकडून VBA ला आमंत्रण मिळाले आणि त्यांनी ते नाकारले हा खोटारडेपणा थांबवला पाहिजे.

जर काँग्रेसला आमच्या ई-मेलला उत्तर द्यायचे असेल आणि VBA सह युती करायची असेल तर ते पुढील 7 दिवसांत उत्तर देऊ शकतात. अन्यथा, आम्ही सर्व 48 जागा लढवण्याच्या आमच्या योजनेनुसार पुढे जाऊ, कारण आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही सर्व 48 जागांसाठी उमेदवार निश्चित करण्याच्या मार्गावर आहोत.

Back to top button
error: Content is protected !!